Monday 29 April 2013

यज्ञातील पशु हत्येबाबत व्यास महर्षी आपले विचार सांगताहेत.

अश्वमेध पर्व पुढे चालू ...
यज्ञातील पशु हत्येबाबत व्यास महर्षी आपले विचार सांगताहेत. प्राचीन काळी एकदा  इंद्राने यज्ञ करत असताना अगस्ती ऋषीं यज्ञातील पशूहत्याकरून केलेल्या हवनामुळे व्यथित होऊन करुणेने म्हणाले,   'देवेंद्रा, पशु वध केलाच पाहिजे असे धर्मविधान नाही. हिंसा न करता ही यज्ञ करता येईल, पण ते इंद्राला मान्य झाले नाही. मग  लोकांत पशूवध सकाम यज्ञ म्हणून मान्यता पावला.  पण जीवाला मारून यज्ञ करावा असे नाही . धान्य वनस्पती वा किंवा जल अथवा आपल्या वाणीने जप अर्पण करून ही यज्ञ साधता येतो. असे करून सर्व जगाच्या कल्याणासाठी कोणी ही निष्काम भावनेने यज्ञ करू  शकतो. असे सामान्यपणे केले गेलेले दान कोणी ही करू शकतो. यज्ञ म्हणजे आपल्यजवळ असलेले आनंदाने दुसऱ्याला देणे हे होय.





No comments:

Post a Comment